Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्व प्रलंबित निवडणुका जानेवारी पर्यंत पूर्ण करा- सर्वोच्च न्यायालय - स्थानिक स्वराज्य...

सर्व प्रलंबित निवडणुका जानेवारी पर्यंत पूर्ण करा- सर्वोच्च न्यायालय – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाला सुनावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.विशेष म्हणजे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत.ओबीसी आरक्षण व इतर कारणांमुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यात आल्या होत्या.यापूर्वी न्यायालयाने मे २०२५ मध्ये चार महिन्यांत निवडणुका घेण्याची मुदत दिली होती.मात्र, पावसाळा आणि प्रशासनिक कारणांमुळे चार महिन्यांचा कालावधी लोटून गेला.अश्यातच आज, मंगळवार १६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले आणि राज्यातील सर्व प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करा,असे निर्देश दिले.प्रसंगी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन्स उपलब्धता,बोर्ड परीक्षा आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत अडचणी स्पष्ट करताच सर्वोच्च न्यायालयाने बोर्ड परीक्षेचे कारण फेटाळून लावत प्रभाग रचना ३१ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत पूर्ण करा आणि ईव्हीएम मशिन्सचा पुरवठा नोव्हेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध करण्याचे आदेश दिल्याने जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांचा बार फुटणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!