- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
धाराशिव :-राज्यात सध्याच्या घडीला बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंचाने स्वतःच्याच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील ३८ वर्षीय सरपंच नामदेव बालिश निकम यांच्यावर २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास होनाळा ते जवळगा (ता.तुळजापूर)रस्त्यावर चार अज्ञात व्यक्तींनी दगड, अंडी,पाईपने मारुन सरपंचांच्या चारचाकीचे काच फोडून पेट्रोलने भरलेले फुगे सरपंचांच्या व त्यांचे साथीदार प्रवीण इंगळे यांच्या अंगावर फेकले.याबाबतची फिर्याद निकम यांनी २७ डिसेंबरला दिल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी तातडीने यात लक्ष घालून अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे तपास दिला.अवघ्या पाच दिवसांत तपास करून फिर्यादीने दिलेला जबाब व घटनास्थळाचा पंचनामा केला असता दोन्ही बाबी वेगवेगळ्या आढळून आल्याने पोलिसांनी विश्वासात घेऊन दोघांचीही चौकशी केली.त्यानुसार बंदुकीचा परवाना मिळविण्याकरीता स्वतःच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यानुसार आता बनाव प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- Advertisement -

