Thursday, April 16, 2026
Homeधाराशिवरोज सकाळी उघडा असणारा दरवाजा आज सकाळी उघडलाच नाही.! - मन सुन्न...

रोज सकाळी उघडा असणारा दरवाजा आज सकाळी उघडलाच नाही.! – मन सुन्न करणारी घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
धाराशिव :-जिल्ह्याच्या बावी गावात आज,सोमवार १६ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.नेहमीची दिनचर्या करणारे कुटूंब दार लावून ची-पटाक करीत नसल्याने शेजारच्यांनी आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने काही नागरिकांनी घराच्या पत्र्याच्या फटीतून टोंगून पाहीले असता २८ वर्षीय तरुण लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी आणि दोन वर्षीय चिमुकला झोपलेल्या अवस्थेत दिसून आला.लगेच नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता धाराशिव तालुक्यातील बावी येथील २८ वर्षीय तरुणाने पत्नी व दोन वर्षाच्या चिमुकल्यास विष देऊन स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.लक्ष्मण मारुती जाधव,वय २८ वर्षे, रा.बावी,ता.जि.धाराशिव असे आत्महत्या करुन कुटुंबाला संपवलेल्या तरुणाचे नाव आहे.लक्ष्मण याचा तीन वर्षापूर्वी तेजस्वीनी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन वर्षाचा शिवांश मुलगाही होता. लग्नानंतर लक्ष्मण जाधव हा पत्नी, मुलासमवेत राहत होता.रोज सकाळी उघडा असणारा दरवाजा सोमवारी सकाळचे दहा वाजले तरी उघडत नसल्याने परिसरातील नागरिकांनी दरवाजा ठोठावला.मात्र, आतून प्रतिसाद मिळत नव्हता.पत्र्याच्या फटीतून काही नागरिकांनी आत डोकावून पाहिल्यानंतर लक्ष्मण जाधव लटकत असलेला व त्यांची पत्नी व मुलगा झोपल्याचे दिसले.त्यानुसार पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड,ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पत्रा कट करुन आत प्रवेश केला. त्यावेळी पत्नी व मुलगा निपचित पडलेले व लक्ष्मण जाधव हा लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.लक्ष्मण जाधव याने स्वतः विष प्राशन करुन पत्नी व मुलांना दिले. त्यानंतर लक्ष्मण याने गळफास लावून आत्महत्या केली.लक्ष्मण हा ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेला होता.शेअर मार्केटमध्येही त्याचे आर्थिक नुकसान झाले होते.कर्जबारीपणामुळे शेतजमीनही विकल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा होती.आर्थिक विवंचनेतून हा प्रकार घडल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!