Monday, July 13, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्याची फसवणूक; १४५ दिवसांचे भातपीक निसावले ८० दिवसांत.. - लोंब गळून पडू...

शेतकऱ्याची फसवणूक; १४५ दिवसांचे भातपीक निसावले ८० दिवसांत.. – लोंब गळून पडू लागल्याने तक्रार; कृषी विभाग शेतबांधावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-लागवड केलेल्या भातपीकाचा कालावधी होण्यापूर्वीच पीक हाती आले खरी; पण निसावलेले धानाचे लोंब गळून पडणे,निसावतांनाच धानाचा फोल होणे व इतर बाबी शेतकऱ्यांना दिसून आल्याने आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यास कृषी विभागाकडे धाव घ्यावी लागले असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या गडचिरोली तालुक्यातील माडेतुकुम येथे यशोदा सिड्स कंपनीने शेतकऱ्याची  फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.माडेतुकुम येथील रामचंद्र ढोंगे या शेतकऱ्याने ४ जून २०२५ रोजी प्रशांत कृषी केंद्र खरपुंडी,ता.गडचिरोली येथील कृषी केंद्रातून खरीप हंगामासाठी NOVA-145 या जातीचे यशोदा सिड्स कंपनीचे १० किलो ग्रॅमची एक बॅग याप्रमाणे ११ बॅग पीक लागवडीसाठी भात पिकाचे वाण खरेदी करून ७ एकरात भातपीकाची लागवड केली होती.या पिकाचे उत्पादन १४५ दिवसात येण्याचे कंपनीकडून तसेच सदरचे भात पिकाची लागवड केल्यानंतर १४५ दिवसात त्याचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार असल्याची बतावणी कृषी केंद्र संचालक आणि कंपनीकडून सांगितल्या गेले होते.मात्र,सदरचे धानपीक ८० ते ८५ दिवसांतच निसावले.धानपीक निसावले खरी; पण धानाचे लोंब गळून पडणे व निसावतांनाच धानाचा फोल होऊ लागल्याने शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. तब्बल ७ एकरातील धानपीक नष्ट होऊ लागल्याने आपली फसगत झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येताच रामचंद्र ढोंगे यांनी सदरच्या प्रकाराबाबतची तक्रार गडचिरोली कृषी विभागाकडे केली.कृषी तज्ञांच्या टीमने पिकाची पाहणी केली असता १४५ दिवसांच्या कालावधीचे धानपीक ८० ते ८५  दिवसांत निसावले असल्याचे दिसून आले.त्यातच ९० टक्के धानपिकांत भेसळ तसेच धान परिपक्व झाल्याचे आढळून आले आहे.त्यातच धान गळून पडणे,फोल होणे इत्यादी बाबी आढळून आल्या आहेत.प्रकरणी कृषी विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला.सदर पंचनामा करतांना गडचिरोली उपविभागीय कृषि अधिकारी मधुगंधा जुलमे,तालुका कृषि अधिकारी सुप्रिया करंबळकर, भाताचे विशेषतज्ञ प्राचार्य डॉ.भुपेश नंदनवार,यशोदा कंपनीचे प्रतिनीधी विक्रांत पाटील,पंचायत समितीचे कृषि अधिकारी वाय.पदा,गुण नियंत्रण कृषि अधिकारी अभिलाशी येरमे,रामकृष्ण भुरले,पंकज गेडाम,रामचंद्र ढोंगे आदी शेतकरी उपस्थित होते.संबंधित कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यास आर्थिक नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!