Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीशहरातील नामांकित व खाजगी शाळांसमोर सर्व सुरक्षा साधने उपलब्ध.. - पण जिथे...

शहरातील नामांकित व खाजगी शाळांसमोर सर्व सुरक्षा साधने उपलब्ध.. – पण जिथे शेतकरी व मजूर कुटुंबातील मुले शिकतात; अश्या शाळांसमोर विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३ सी वरील साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर तात्काळ स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक आणि झेब्रा क्रॉसिंग बसवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत,अशी मागणी साखरा येथील रहिवासी दिनेश बोरकुटे यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षांकडे केली आहे.
बोरकुटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,साखरा गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ही राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या २० फूट अंतरावर आहे.शेकडो विद्यार्थी दररोज हा महामार्ग ओलांडून शाळेत ये-जा करतात.या मार्गावरील वाहने सुसाट वेगाने पळविली जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला सतत धोका निर्माण होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता कायम आहे.या विषयावर यापूर्वीही अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे.सन २०१९ मध्ये तत्कालीन उपसरपंच अर्चनाताई चुधरी(बोरकुटे) यांनी हा प्रश्न राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग,नवी दिल्ली तसेच गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त जनसुनावणीत मांडला होता.हा विषय राज्य बाल अधिकार संरक्षण आयोग,मुंबई यांच्याही निदर्शनास आणून देण्यात आला होता.ग्रामपंचायत साखरा यांनी विशेष ग्रामसभेत शाळेसमोर स्पीड ब्रेकर बसविण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करून जिल्हा प्रशासनास पाठवला होता. तरीदेखील आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे बोरकुटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.त्यांनी सांगितले की,गडचिरोली शहरातील नामांकित व खाजगी शाळांसमोर सर्व सुरक्षा साधने उपलब्ध आहेत.परंतु,साखरा शाळेसमोर जिथे शेतकरी व मजूर कुटुंबातील मुले शिकतात,तिथे अजूनही कोणतीही सुविधा नाही.हे अत्यंत अन्यायकारक व भेदभावपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मानक दर्जाचे स्पीड ब्रेकर,चेतावणी फलक,झेब्रा क्रॉसिंग व इतर आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात,अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे.त्यामुळे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!