- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-देशाची आण,बाण आणि शान असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये काल रविवारी खेळल्या गेलेल्या यंदाच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझिलंड संघाचा पराभव करून तब्बल ९६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.भारतीय संघाने या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही भारत बनला आहे. त्यामुळे,भारतीय क्रिकेट संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याने आज,सोमवार ९ मार्च रोजी राज्य विधिमंडळात ट्वेंटी-२० विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करतांना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.या विजयामुळे टी-२० विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे,असे ते म्हणालेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडला.ते म्हणाले,आज सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करतांना मला अतिशय आनंद वाटत आहे. अभिमान वाटत आहे.कर्णधार सूर्यकुमार यादव हे आपल्या मुंबईचे आहेत.शिवम दुबेही मुंबईचे आहेत. मुंबईने अनेक महान खेळाडू भारताला दिलेत.आज आपल्या गावातील सामान्य खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.यातील अनेक खेळाडू अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेत.ते आज खेळाचे व देशाचे नाव मोठे करत आहेत.मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय संघाला पाठवावी अशी विनंती करतो आहे;असे ते म्हणाले.त्यानंतर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते पारित झाल्याचे घोषित करून त्याची प्रत संबंधितांना पाठवण्याचे आदेश दिले.
- Advertisement -

