उद्रेक न्युज वृत्त :-ई-केवायसीमुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची धाकधूक वाढली होती.सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये ई-केवायसी केलेल्यांनाच येणार की काय? अशी शंका अनेकांच्या मनात घर करून सोडत होती. अश्यातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच १० ऑक्टोंबर पासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी घाबरण्याचे कारण नसून सर्वांनाच सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.मात्र,सर्व लाडक्या बहिणींनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,असेही मत्री तटकरे यांनी म्हटले आहे.


