Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीरोजगार मिळाला गावातच, पण मजुरी मिळेना धावतच..!-एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची...

रोजगार मिळाला गावातच, पण मजुरी मिळेना धावतच..!-एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी थकली…-गडचिरोली जिल्ह्यातील मजुरी १ कोटींच्या वर प्रलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- गावातील अकुशल मजुरांना गावातच रोजगार मिळावा; यासाठी रोजगाराची हमी असलेला कायदाच तयार करण्यात आला.त्यानुसार यंत्रणा स्तर आणि पंचायत स्तरावरून अकुशलची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाऊन मजुरांच्या हाताला काम मिळू लागले व काही प्रमाणात उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटू लागला आहे.मात्र,रोजगार मिळाला गावातच,पण मजुरी मिळेना धावतच..! असे हल्ली चित्र निर्माण झाले आहे.एक महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी थकली असल्याने हातावर पोट भरणाऱ्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्याच्या घडीला सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेतीचा हंगाम सुरु झाला आहे.शेतीसाठी पैश्याची जुळवाजुळव अनेकांना करावी लागत असते. अशातच१५ दिवसांच्या आत मजुरांना मजुरी मिळावी,असा निकष आहे.मात्र,महिना लोटूनही मजुरी न मिळाल्याने मजुरांना आर्थिक बाब भेडसावत आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामे करण्याऱ्या मजुरांना १०० दिवसांचा रोजगार रोहयोतून उपलब्ध करुन दिला जातो.रोहयोतून सार्वजनिक तसेच वैयक्तिक स्वरुपाची अकुशल,कुशल कामे मोठ्या प्रमाणात केली जातात.१८ वर्षांवरील नोंदणीकृत मजुरांनी कामाची मागणी केल्याने मजुरांना कामे मिळाली.मात्र,१५ दिवसाच्या आत मजुरांना मजुरी देण्याची तरतूद असताना महिनाभरापासून मजुरीपासून वंचित राहावे लागत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास हजेरीपत्रक बंद केल्याच्या १६ दिवसानंतर प्रतिदिन मजुरीच्या ०.०५ टक्के दराने विलंब आकार(डीले पेमेंट) दिला जातो.अशातच झालेला डीले पेमेंट संबंधितांकडून वसूल करण्यात येतो.मात्र,शासनाकडून रक्कम अदा करण्यात आली नसेल तर असा डीले झालेला पेमेंट कुणाकडून वसूल करणार?असा प्रश्न उपस्थित होतो आहे.गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांची जवळपास १ कोटी १८ लाख ७५ हजार रुपयांची मजुरी थकीत आहे.१५ दिवसांच्या आत मजुरी संबंधित मजुरांच्या खात्यावर डीबीटीद्वारे जमा होणे आवश्यक आहे.मात्र,एक महिना लोटूनही मजुरी मिळाली नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनाने लवकरात-लवकर रोजगार हमी योजनेच्या मजुरांची मजुरी अदा करावी; अशी मागणी मजूर वर्गांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!