Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व...

मोठी बातमी,चामोर्शी शहरातील बाल विवाहास घातला आळा- बाल संरक्षण कक्ष गडचिरोली व पोलीस प्रशासन चामोर्शी यांची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्ह्यातील चामोर्शी तालुका शहरामध्ये आज १० मार्च २०२३ रोजी बालविवाह होणार असल्याची गुपित माहिती चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ यांना मिळताच लगेच त्यांनी सदर घटनेची माहिती गडचिरोली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांना दिली.जिल्हा बाल संरक्षण व पोलीस पथक यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता विवाह स्थळास भेट देऊन बालविवाहास आळा घालण्यात आला.मुलाची व मुलीचे जन्म पुरावा तपासणी करून  बालीका १८ वर्षाखालील आणि मुलगा २१ वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच बालिकेचे व मुलाचे आणि कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

मुलीकडचे व मुलाकडचे दोन्ही मंडळी नागभिड तालुका जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते चामोर्शी शहरात फेब्रुवारी  महिन्यात रोजगाराच्या शोधात कामाकरिता (भटकंती जमात) आले होते. एक दिवसा आधी त्यांनी हळदीचा कार्यक्रम पार पाडला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता वधू व वरांकडील नातेवाईक यांच्या उपस्थितीत बालविवाह चामोर्शी येथे होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली असल्याने त्यानुसार पोलीस विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांनी सदर बालिकेच्या तात्पुरता स्वरूपात राहणाऱ्या ठिकाणी त्यांचे घर गाठून मुलीच्या आई वडिलांकडून मुलीचे १८ वर्ष व मुलाचे २१ वर्ष पूर्ण होइपर्यंत बालिकेचे विवाह करणार नाही.असे हमी पत्र लिहून घेतले व बालिकेचे व मुलाचे समुपदेशन करण्यात आले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले  यांचे उपस्थितीत वधू पक्ष यांना एकत्र बसवून बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायद्या नुसार होणारी कारवाई बाबत उपस्थित कुटूंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली.

सदर कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले,  पोलीस स्टेशन चामोर्शीच्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी वाघ,बाल संरक्षण अधिकारी कवेश्वर लेनगुरे, पोलीस स्टेशन चामोर्शी येथील पोलीस जीवन हेडावू, सामाजीक कार्यकर्ते जयंत जथाडे,क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार यांनी कार्यवाही केली.

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्ड लाईन टोल फ्री नंबर १०९८  वर बाल विवाह बाबत संपर्क करावे;असे आवाहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!