Saturday, September 5, 2026
Homeमुंबईमहायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव...

महायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आज सोमवारी ९ डिसेंबरला आपला विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला जाणार आहे.दरम्यान,येत्या गुरुवार १२ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
२८८ सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे तब्बल २३७ आमदारांचे बहुमत आहे.त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत होणे,ही केवळ औपचारिकता राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यातील फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.उदय सामंत,दिलीप वळसे पाटील,रवी राणा हे नियम २३ अन्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत असल्याचा प्रस्ताव मांडतील.महायुतीकडील भरभक्कम बहुमतामुळे आवाजी मतदानाने हा प्रस्ताव संमत केला जाण्याची शक्यता अधिक आहे.दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!