- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट रोजी राज्याच्या विविध भागात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. अश्यातच काल मंगळवारी गडचिरोली जिल्ह्याच्या इंद्रावती नदीचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच भामरागड लगतचे छत्तीसगड राज्यातील भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन भामरागड परिसराच्या पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे.पुराची पूर्व सूचना लक्षात घेता काल रात्रीच भामरागड शहरातील बाजारपेठेतील दुकानातील साहित्य प्रशासनाद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.त्यातच आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१३० डी,भामरागड पर्लकोटा वाहतुकीचा पूल पाण्याखाली आल्यामुळे सद्यस्थितीत हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद आहे.पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये,अश्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
- Advertisement -

