Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीबनविलेला रस्ता खोदणे वनपरिक्षेत्राधिकारीच्या अंगलट..!

बनविलेला रस्ता खोदणे वनपरिक्षेत्राधिकारीच्या अंगलट..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील
आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटरचा गिट्टी टाकून बनविलेला रस्ता वनकायद्यावर बोट ठेवत चक्क भाड्याने ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त केला होता.यानंतर कंत्राटदाराने गडचिरोलीचे सहपालकमंत्री ॲड.जयस्वाल यांच्याकडे धाव घेतली.ॲड.जयस्वाल यांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.त्यातच ६ जून रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असतांना आढावा बैठकीत उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना सुनावले होते. ‘वनाधिकाऱ्यांचा दहशतवाद खपवून घेणार नाही,थेट घरी पाठविणार,’ अशा कठोर शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.त्यानंतर आता वनकायद्याच्या नावाखाली कामे अडविणाऱ्या वनाधिकाऱ्यांना अद्दल घडवून अखेर वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!