Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरनिवांत झोपलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागताच चवताळून चढवला हल्ला..!

निवांत झोपलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागताच चवताळून चढवला हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-वन्य प्राण्यांचे जंगल मानवी वस्त्यांत रूपांतरित होऊ लागल्याने वन प्राण्यांच्या भटकंतीत वाढ झालेली दिसून येत आहे.विशेष म्हणजे,ज्यांच्या घरावर आपण कब्जा करणार,असा मनुष्य वा प्राणी आपले हक्क मुळीच सोडणार नाही.त्यामुळे वाघ, अस्वल, बिबट्या व इतर हिंस्त्र प्राण्यांचा मोर्चा मानवी वस्त्यांकडे वळलेला दिसून येतो.अश्यातच गावापासून हाकेच्या अंतरावर शेतात असलेल्या घराच्या छपरीत (ओसरीत) दाराच्या आड झोपून असलेल्या बिबट्याला खुर्चीचा धक्का लागला आणि त्याने चक्क शेतकऱ्यावर हल्ला चढविला.यात शेतकऱ्याच्या छाती व पाठीवर गंभीर दुखापत झाली.आतील दार बंद असल्याने घरातील मंडळी सुदैवाने बचावली असल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील खंडाळा (पिपरी) शिवारात काल रविवारी सकाळच्या सुमारास घडली. कैलास परसराम गभणे वय ३९ वर्षे,रा.खंडाळा-पिपरी,ता.मौदा, जि.नागपूर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कैलास गभणे यांची शेती गावापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे.मागील काही वर्षापासून कुटुंबीयांसह शेतातील घरात राहतात.धानाच्या रोवणीसाठी चिखलणी करायची असल्याने ते काल रविवारी सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून जागे झाले आणि आंघोळीसाठी पाणी गरम करायचे असल्याने ते घराचे मुख्य दार उघडत छपरीत गेले. दाराशेजारी खुर्ची होती व खुर्चीच्या बाजूला ओसरीत बिबट्या झोपून होता.कैलास यांचा अनवधानाने खुर्चीला धक्का लागला.खुर्चीचा धक्का लागताच बिबट्या चवताळून उठला व त्याने कैलासवर हल्ला चढविला.दोनदा झडप मारल्याने ते खाली कोसळले व आरडाओरडा करू लागले.त्यामुळे बिबट्या पळून गेला.मात्र,हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला. श्रीधर गभणे यांनी त्यांना मौदा तालुक्याच्या धानला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.माहिती मिळताच मौदाचे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या सूचनेवरून ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते,माजी पंचायत समिती सभापती स्वप्निल श्रावणकर,ठाणेदार स्नेहल राऊत,सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील सोनवणे,वन विभागाचे श्रावण अडमाची यांनी घटनास्थळाची पाहणी केली.घटनेच्या वेळी कैलासची पत्नी व इतर सदस्य घरात झोपले होते.कैलास यांनी घराबाहेर पडताच दार बंद केले होते.त्यामुळे बिबट्याला आत शिरणे शक्य झाले नाही.त्यामुळे घरातील मंडळी सुरक्षित राहिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!