उद्रेक न्युज वृत्त :-नक्षली हिंसक कारवाया सोडून पुढील जीवन आल्हाददायी जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका महिलेसह एकूण १६ नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज,सोमवार २ जून रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.राज्य सरकारच्या ‘नियाद नेलनार’ (तुमचे चांगले गाव) योजनेने प्रभावित होऊन या सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.छत्तीसगड राज्य सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत नक्षलमुक्त ग्रामपंचायतीला विकास प्रकल्पांसाठी एक कोटी रुपये देखील देण्यात येणार आहेत.या योजने अंतर्गत, नक्षलमुक्त गावांमध्ये विकास कामे सुलभ केली जाणार आहेत.सर्व नक्षलवाद्यांवर एकूण २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.यापैकी दोघांवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते.त्यापैकी एक ३६ वर्षीय रीता उर्फ दोडी सुक्की आणि १८ वर्षीय राहुल पुनीम यांच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. याशिवाय,२८ वर्षीय लेकम लखमा वर तीन लाख रुपये आणि इतर तीन नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते.यापैकी ९ नक्षलवादी हे चिंतलनार पोलीस स्टेशन परिसरातील केरळपेंडा गावातील रहिवासी होते.त्यांच्या आत्मसमर्पणामुळे ही ग्रामपंचायत पूर्णपणे नक्षलमुक्त झाली आहे.यापूर्वी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला बडेसट्टी ग्रामपंचायत नक्षलमुक्त घोषित करण्यात आली होती.आज सोमवारी पार पडलेल्या आत्मसमर्पण कार्यक्रम प्रसंगी एसपी किरण चव्हाण, एसएसपी उमेश गुप्ता आणि सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.
‘नियाद नेलनार’ योजनेने प्रभावित होऊन १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

