Thursday, April 16, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण -  जेमतेम बोटावर...

देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील रोजगार हमीच्या कामांना लागले ग्रहण –  जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच कामे सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :-रोजगाराची हमी देणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या यंत्रणा स्तरावरील कामांना हल्ली ग्रहण लागले आहे.देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरील कामे जेमतेम बोटावर मोजण्याइतकीच सुरू असल्याने तालुक्यातील संपूर्ण गावात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी.अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर,डोंगरगांव व बोळधा या ठीकाणी यंत्रणा स्तरावरील केवळ तीन ते चारच कामे सुरू असून कोंढाळा,कुरुड,चोप,मोहटोला,आमगाव,गांधीनगर,विसोरा,उसेगाव,कोकडी,तुळशी,पोटगांव,कसारी,अरततोंडी,पिंपळगाव,शंकरपूर व इतर गावांमध्ये यंत्रणेची एकही कामे सुरू नसल्याने मजूर वर्ग रोजगाराच्या शोधात भटकंती करतांना दिसून येत आहेत.रोजगार हमी योजनेची कामे दोन स्तरावर केली जातात.एक यंत्रणा स्तर तर दुसरे पंचायत स्तर; यामध्ये यंत्रणा स्तरावर वन विभाग,इटीयाडोह विभाग,कृषी विभाग,सिंचाई विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग तर पंचायत विभाग स्तरावर ग्रामपंचायतीच्या मार्फतीने रोजगार हमीची कामे गावातील मजुरांदद्वारे केली जातात.मजुरांद्वारे केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर इतर साहित्यांची कामे करून घेण्यास कुशल कामे म्हटले जाते.

यंत्रणा स्तरावर ५० टक्के तर पंचायत स्तरावर ५० टक्के कामे केली जातात.मात्र हल्ली देसाईगंज तालुक्यातील गावांमध्ये अकुशल कामांचा थांगपत्ताच लागत नाही.तालुक्यात एवढी मोठी यंत्रणा असून रोजगार हमीची कामे सुरू कां बरं केली जात नाही?याचे नवल वाटत आहे.शासन स्तरावरून एका वर्षात एका कुटुंबातील सदस्यांना १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली जाते.मात्र १०० दिवस तर सोडा साधे एका कुटुंबाला साधे ५० दिवस सुध्दा काम दिले जात नाही.यंत्रणा स्तरावर रोजगार हमीची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे.गेली १० वर्षापूर्वी कुशल प्लस अकुशल मिळून भरपूर कामे केली जायची व गावातील मजुरांना गावातच रोजगार मिळायचा; मात्र अलीकडे कुशलचा निधी चार ते पाच वर्षे मिळत नसल्याने भरपूर प्रमाणात रोजगार हमीची कामे होतांना दिसून येत नाही.डिगीमडागिम केवळ शासनास दाखविण्याकरिता कामे केली जात आहेत.

यामुळेच ‘रोजगाराची हमी,कामाची कमी’ असे झाले असल्याने; याकडे लक्ष घालून तालुक्यातील सर्वच गावात रोजगार हमीची कामे सुरू करून गावातील कुटुंबातील सदस्यांना रोजगार द्यावा;अशी मागणी सर्वत्र जोर धरू लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!