Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीदेसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते...

देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा,कोरची तालुक्यातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्या.. -काँग्रेस नेते रामदास मसराम व मित्र परिवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्यात सतत चार दिवस संततधार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित होऊन काहींची घरे पडली तर काहींच्या घरात पाणी शिरून संपूर्ण घर जलमय झाल्याने लोकं चिंतातुर झाले आहेत.अशातच जिल्ह्यातील देसाईगंज,आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून शेतात पऱ्हे टाकले.पऱ्हे टाकून धान रोवणी केली.मात्र,धान रोवणी होताच पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.शहरी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.त्यामुळे महसूल प्रशासन विभागाने पडझड झालेल्या घरांची तसेच शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी; अशी मागणी शेतकरी नेते तथा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी केली आहे.

देसाईगंज तालुक्यासह इतरही तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने रामदास मसराम व मित्र परिवार यांनी तालुक्यातील पूर परिस्थितीची दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी संपूर्ण तालुक्याच्या गावातील शेतकऱ्यांना भेटी देऊन पूरस्थितीची पाहणी केली.पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तात्काळ 

 शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.मागील वर्षाच्या २०२३ मधील ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांचे पुरामुळे शेतातील धानपीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.शेतीचे पंचनामे करून याद्याही तयार करण्यात आल्या.मात्र,तालुक्यातील  नुकसानीची १ कोटींच्यावर शेतकऱ्यांची रक्कम अजूनही मिळाली नाही.त्यामुळे मागील वर्षी व यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे; अशांना सरसकट त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी रामदास मसराम व मित्र परिवार यांनी केली आहे.

नुकसानीची पाहणी करतांना शेतकरी तथा काँग्रेस नेते रामदास मसराम,माजी देसाईगंज पंचायत समिती सभापती परसराम टिकले,माजी देसाईगंज पंचायत समिती उपसभापती नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते अरुण कुंभलवार,सागर वाढई हितेश तुपट,जावेद शेख,स्वप्नील मिसार,गौरव शिलार व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!