Monday, September 7, 2026
Homeगडचिरोलीदुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर...

दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात.. -पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी; दुपारची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोलीचामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग कमी करण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन,यात मोरेश्वर दादाजी सातपुते वय ६० वर्षे रा.चामोर्शी, जि.गडचिरोली हे जागीच ठार झाले तर पत्नी सुमन मोरेश्वर सातपुते वय ५५ वर्षे ह्या गंभीर जखमी झाल्याची घटना आज,बुधवार २३ एप्रिलला दुपारच्या सुमारास घडली.
माहितीनुसार,मोरेश्वर सातपुते हे धानोरा तालुक्यातील
केरोडा येथे दुचाकीने पत्नीला आणण्यासाठी गेले होते.पत्नीला घेऊन येत असतांना गडचिरोलीचामोर्शी मार्गावरील दर्शनी चक गावा नजीक दुचाकीचा वेग पाणी पिण्यासाठी कमी करीत असतांनाच मोरेश्वर सातपुते यांचा दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रोलिंगला दुचाकी धडकली.दुचाकी रोलिंगला धडकताच मोरेश्वर सातपुते रोलिंगलाच लटकून राहिले.त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाल्या.सदरची घटना नागरिकांच्या निदर्शनास येताच गडचिरोली पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी मृतदेह तसेच जखमी महिलेस तात्काळ गडचिरोली सामान्य रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!