- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राशन दुकानांतून कोट्यवधी लाभार्थ्यांना मोफत राशनचा लाभ देण्यात येत आहे.अशातच काही बोगस लाभार्थीही राशन उचलीत असल्याने यावर शासनाने रामबाण उपाय शोधत ई- केवायसीचा फंडा वापरला आहे.त्यामुळे शासनाने ई – केवायसी राशन दुकानात करून घेणे अनिवार्य केले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता राज्य सरकारने ई-केवायसी म्हणजेच थम्ब व्हेरिफिकेशन करण्याची अट घातली आहे.जेणेकरून या योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ई-केवायसीतून घेतला जाईल व बोगस लाभार्थ्यांना चपराक बसेल.थम्ब व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून,त्यानंतर स्वस्त धान्याचा लाभ १ नोव्हेंबर २०२४ पासून बंद होणार आहे.
थम्ब व्हेरिफिकेशनला केवळ पाचच दिवस उरले असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांची व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठी लगबग सुरू झाली आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळवण्यासाठी स्वस्त धान्य सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच तसे निर्देश दिले आहेत.मात्र,तरीही अनेक शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.त्यामुळे व्हेरिफिकेशन पूर्ण न झालेल्या शिधापत्रिकाधारकांचे स्वस्त धान्य १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.त्यामुळे लवकरात-लवकर लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी; असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

