Monday, May 25, 2026
Homeब्रम्हपुरीतुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी...

तुम्ही दोन उपमुख्यमंत्री तर आम्ही दोन उपसरपंच का नाही..? ब्रह्मपुरी सरपंच संघटनेनी केली निवेदनाद्वारे मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

ब्रह्मपुरी :- राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर झाले होते.त्यात नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे पद होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यामुळे हल्ली राज्यात दोन उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दोन उपसरपंच पद निर्माण करण्यात यावे; याबाबतचे निवेदन ब्रह्मपुरी येथील सरपंच संघटनेने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले आहे

भारतीय संविधानानुसार लोकशाही व्यवस्थेत लोकसभा,राज्यसभा तर राज्यात विधानसभा व विधानपरिषद या सभागृहातून राज्याचा चालवला जातो.ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावखेड्याचा विकासात्मक कारभार केला जातो. त्याकरिता ग्रामपंचायतमध्ये दर पाच वर्षांत निवडणुका घेऊन सरपंच,उपसरपंच यांची निवड करून विकासात्मक कारभार चालवला जातो. राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्याचा कारभार चालविण्यासाठी मुख्यमंत्री व त्यांच्या नियंत्रणात मंत्रिमंडळ व उपमुख्यमंत्री पद निर्माण करण्यात आले होते.त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कारभार चालवीत होते.मात्र नुकतेच शिंदे फडणवीस सरकार असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने अजित पवार ते सरकारमध्ये सामील झाले.याच धर्तीवर ग्रामपंचायती मध्ये सुध्दा दोन उपसरपंच पद निर्माण करावे; अशी मागणी सरपंच संघटनेंनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!