Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीजिथे कधीकाळी भीतीचे सावट होते; तिथे आज संविधान,लोकशाही आणि शांततेचा आवाज घुमू...

जिथे कधीकाळी भीतीचे सावट होते; तिथे आज संविधान,लोकशाही आणि शांततेचा आवाज घुमू लागला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील भामरागड तालुक्याच्या शेवटच्या टोकावर,छत्तीसगड सीमेवर वसलेल्या बिनागुंडा या गावात नुकताच एक प्रेरणादायी क्षण साकारण्यात आला.दीर्घकाळ नक्षलवाद्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्गम भागात,विनोबा आश्रम शाळा बिनागुंडा येथील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आदित्य पोदाडी याने सुरेल आवाजात महाराष्ट्र राज्यगीत सादर करत उपस्थितांच्या मनात आशा,आत्मविश्वास आणि अभिमानाचा दीप प्रज्वलित केला.३१ जानेवारी रोजी बिनागुंडा येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत हे स्फूर्तीदायक सादरीकरण झाले. नुकतेच २४ जानेवारी रोजी अवघ्या २४ तासांत उभारण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रामुळे या भागात सुरक्षिततेची नवी पहाट उजडली आहे. महासंचालक दाते यांनी येथे प्रत्यक्ष भेट देत स्थानिक पोलीस दलाचे मनोबल वाढवले आणि नागरिकांशी संवाद साधला.या पार्श्वभूमीवर आदित्यच्या स्वरातून उमटलेले महाराष्ट्र राज्यगीत केवळ सांस्कृतिक सादरीकरण नव्हे; तर बदलाचे प्रतीक होते.जिथे कधीकाळी भीतीचे सावट होते,तिथे आज संविधान, लोकशाही आणि शांततेचा आवाज घुमू लागला आहे लहानशा विद्यार्थ्याच्या गाण्याने संपूर्ण परिसर भारावून गेला आणि टाळ्यांच्या कडकडाटात विश्वासाचा नवा अध्याय लिहिला गेला. अनेक दशकांपासून नक्षल्यांनी वेढल्या गेलेल्या या भागात,शिक्षण,सुरक्षा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती एकत्र येऊन विकासाचा मार्ग प्रशस्त होत असल्याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे.बिनागुंडात निनादलेले महाराष्ट्र राज्यगीत म्हणजे भीतीवर मात करत पुढे जाण्याचा निर्धार,आणि शांततेच्या दिशेने चाललेले आत्मविश्वासपूर्ण पाऊल आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री; एसटीच्या तिकीट दरात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी बसेसच्या भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशांतील युद्धामुळे इंधनाच्या किंमतीत...

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!