- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात जातनिहाय जनगणनेचा धडाका पुढील वर्षापासून सुरू होणार आहे.तत्पूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पासून राज्यातील सर्व प्रशासकीय सीमा गोठवण्यात येणार आहेत.गणना क्षेत्रे निश्चित झाल्यानंतर सीमांमध्ये बदल करता येणार नाही.प्रशासकीय सीमा निश्चित झाल्यानंतर तीन महिने लोटल्यास जनगणना सुरू केली जाऊ शकते.त्यामुळे १ जानेवारी २०२६ ते ३१ मार्च २०२७ या दरम्यान बदल करता येणार नाहीत. सीमांमधील कोणतेही बदल राज्यांच्या जनगणना संचालनालय व देशाच्या महानिबंधक कार्यालयाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कळवणे बंधनकारक आहे. जनगणना कार्यात कोणीही वगळले जाऊ नये किंवा दोनदा नोंदणी होऊ नये यासाठी प्रत्येक गाव किंवा शहराला समान आकाराच्या गणना क्षेत्रांमध्ये विभागले जाते आणि प्रत्येक क्षेत्रासाठी एक गणनाकर्ता नेमला जातो.जिल्हे,तालुके,पोलिस ठाणे,महसुली गावे इत्यादींच्या प्रशासकीय सीमांमध्ये बदल करायचे असल्यास ते ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी करून घ्यावेत,अशा सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत.२०२६ व २०२७ अश्या दोन टप्प्यात जातनिहाय जनगणना केली जाणार आहे.पहिला टप्पा १ एप्रिल २०२६ पासून सुरू होऊन त्यात घरांची मोजणी केली जाईल.दुसरा टप्पा १ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होईल,ज्यामध्ये लोकांची लोकसंख्या,जात आणि इतर आवश्यक माहिती गोळा केली जाणार आहे.देशात पहिल्यांदाच डिजिटल जनगणना केली जाणार आहे.जनगणना संचालनालय यासाठी एक ॲप लाँच करणार आहे.हे ॲप अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीसाठी असेल.कुटुंब प्रमुख स्वतः त्याच्या घराची आणि कुटुंबाची माहिती भरू शकेल. ॲपवर तपशील भरल्यानंतर,जनगणना अधिकारी घरी जाऊन माहितीची उलट तपासणी करतील.त्यानंतर ती डिजिटल फॉर्मवर अपलोड केली जाईल.जनगणनेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यावर १५० ते १७५ घरांची जबाबदारी असेल. जनगणना सुरू होण्यापूर्वी,राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये त्याची पूर्व-चाचणी केली करण्यात येणार आहे.सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी देशभरात सुमारे ३४ लाख कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे.
- Advertisement -

