उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- गेल्या चाळीस वर्षांपासून ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे,या मागणीसाठी सतत आंदोलने करण्यात आली.मागील एक वर्षापासून जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले.मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात आझाद मैदान येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्ह्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.याच अधिवेशनात नवीन जिल्हे आणि तालुके निर्मितीसाठी दांगट समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्याबरोबर ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती जिल्ह्याच्या मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाली असून मंगळवार दि.१५ जुलैपासून ब्रम्हपुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समितीच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.उपोषण २३ जुलैपर्यंत सुरू राहणार असून मंगळवारी (दि.१५ जुलै पासून प्रा.देविदास जगनाडे,डॉ.प्रेमलाल मेश्राम,राजू भागवत,विनोद झोडगे,प्रशांत डांगे अविनाश राऊत, दत्तू टिकले,मंगेश फटिंग,सुनील विखार,रमेश गणवीर, दीपक नवघडे उपोषणाला बसले आहेत.ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले.

