Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.....

चंद्रग्रहण ही साधी खगोलीय घटना; ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही.. – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,मंगळवार ३ मार्चला वर्षातील पहिले चंद्रग्रहण पहावयास मिळणार आहे.या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया आणि काही माध्यमांमधून नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचे काम तसेच अंधश्रध्देला खतपाणी घातले जात असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने(अंनिस)ग्रहणाचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही,असे असतांना देखील राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडियावर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणासंबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.त्यामुळे,ग्रहणाबाबत अंधश्रद्धा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर शासनाने कठोर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राहुल थोरात,डॉ.हमीद दाभोलकर,मिलिंद देशमुख,नंदिनीं जाधव,रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर,डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे,प्रकाश घादगिने,मुक्ता दाभोलकर,फारुख गवंडी प्रवीण देशमुख आदींनी केली आहे.चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे.त्यामध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा किरणे तयार होत नसतात.दर सहा महिन्यानंतर पृथ्वी,चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे; असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!