उद्रेक न्युज वृत्त :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने या वर्षाच्या सुरुवातीला घेतला आहे. या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळणार आहे.
शेतात काम करताना सर्पदंश,वीज पडून इतर अपघातात,शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या वारसदारास अर्थसाहाय्य मिळते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आजही या योजनाबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही.
शेतकऱ्याची पत्नी असलेल्या महिलेचा तसेच शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास त्या महिलेच्या वारसदारास दोन लाख रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत सरकारतर्फे लाभार्थ्यांना दिले जाते.
शेतात काम करताना अपघात,वीज पडणे,पूर,सर्पदंश, विंचू देश,विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात झाल्यास,तसेच रस्त्यावर वाहन अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. त्यांच्या वारसांना सानुग्रह निधी दिला जातो.

