Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये  झाले महत्त्वाचे बदल…-आता 'या' कारणामुळे मिळणार...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये  झाले महत्त्वाचे बदल…-आता ‘या’ कारणामुळे मिळणार शेतकरी पतीला दोन लाख रुपयांची मदत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने या वर्षाच्या सुरुवातीला घेतला आहे. या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळणार आहे.

शेतात काम करताना सर्पदंश,वीज पडून इतर अपघातात,शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या वारसदारास अर्थसाहाय्य मिळते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आजही या योजनाबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही.

शेतकऱ्याची पत्नी असलेल्या महिलेचा तसेच शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास त्या महिलेच्या वारसदारास दोन लाख रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत सरकारतर्फे लाभार्थ्यांना दिले जाते.

शेतात काम करताना अपघात,वीज पडणे,पूर,सर्पदंश, विंचू देश,विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात झाल्यास,तसेच रस्त्यावर वाहन अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. त्यांच्या वारसांना सानुग्रह निधी दिला जातो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!