Monday, August 31, 2026
Homeनागपूरबुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

बुद्धपौर्णिमेच्या दिवशीच कां केली जाते प्राणीगणना?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- बुद्धपौर्णिमा आणि पाणवठ्यावरील निसर्ग अनुभव कार्यक्रम हे एक वेगळे समीकरण झाले आहे. बुद्धपौर्णिमेची रात्र वर्षातील सर्वाधिक लख्ख प्रकाशाची रात्र समजल्या जाते.त्यामुळे यादिवशी महाराष्ट्र वन विभागाकडून वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.या उपक्रमाचा प्रारंभ बुधवारी, २२ मे रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले.पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३७, उमरेड करांडला व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३४ आणि बोर (वर्धा) व्याघ्र प्रकल्पांतर्गत ३५ मचाणांची व्यवस्था या उपक्रमासाठी करण्यात आली आहे.

वन्यजीव प्रेमींसाठी हा संपूर्ण अनुभव थरारक आणि अतिशय उत्सुकतेचा असल्याने हे क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज वन विभागाला प्राप्त होतात.त्याची छाननी करून त्यानंतर काही अर्जावर शिक्कामोर्तब करण्यात येते.त्यानंतर एका मचाणावर एक निसर्गप्रेमी आणि वन्य रक्षकाची नेमणूक होते.विशेष म्हणजे पेंचसह उमरेड करांडला, पवनी आणि बोरच्या सर्वच वनपरिक्षेत्रात जय्यत तयारी करण्यात येत आहे.खास मचाणांची व्यवस्था करण्यात येते.पाणवठ्याजवळ उभारण्यात आलेल्या मचाणावरून रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यास येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद करण्यात येते.

प्राणिगणना उन्हाळ्यातच करण्याचे मुख्य कारण म्हणजे,या काळात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटतात आणि पाण्याचा तुटवडा भासतो.अशावेळी जंगलातील बहुतेक प्राणी पाणवठ्यावर येतात.त्यामुळे वन्यजीव प्रेमी आणि वन कर्मचारी दुपारपासून मचाणांवर मुक्काम करतात.रात्री पाण्यासाठी पाणवठ्यावर प्राणी आले की त्यांच्या नोंदी घेतल्या जातात.

नासाची मिल्कमूनची व्याख्या अशी आहे👇

बौद्धपौर्णिमेचा चंद सर्वात प्रकाशमय चंद्र म्हणून ओळखण्यात येतो.अंतराळ संस्था नासाने यादिवशीच्या चंद्राची व्याख्या कॉर्नमून किंवा मिल्कमून म्हणूनही केली आहे.यंदाचा चंद्र सुमारे तीस टक्के अधिक चमकणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.अशा बौद्धपौर्णिमेच्या रात्री वन विभागाने निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!