Saturday, June 13, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटणाऱ्या गावांतील रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?-मुंबई...

गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटणाऱ्या गावांतील रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?-मुंबई उच्च न्यायालयाने गडचिरोली जिल्हाधिकारी व सार्वजनीक बांधकाम विभागाला दिले आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या वेंगणूर,सुरगाव,अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना मुख्य भागासोबत जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेले रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?अशी विचारणा करीत रस्ता निर्मितीबाबतच्या अहवालासह प्रत्यक्ष हजर रहा; असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दि.१९ जून ला जिल्हाधिकारी व सार्वजनीक बांधकाम विभागाला दिले आहे.

सदर प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्या. अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनवाणी झाली. गडचिरोलीतील दुर्गम गावातील नागरिकांनी २०२२ मध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून व्यथा कळवल्या होत्या.त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. पावसाळ्यात दिना धरणामध्ये पाणी भरल्यानंतर संबंधित गावे सहा ते सात महिन्यांसाठी संपर्काबाहेर जातात.त्यांचा जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटतो. दरम्यान,नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो.परिणामी अकस्मात परिस्थितीत नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. या काळात अनेक नागरिकांना विविध कारणांमुळे प्राणही गमवावे लागतात.बुधवारी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिका-यांच्या वतीने या गावांमध्ये विकास कार्य होत असल्याची माहिती दिली.मागील सुनावणीत न्यायालयाने जिल्हाधिका-यांना कार्याबाबत विचारणा करीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही जिल्हाधिकारी यांनी प्रगती अहवाल सादर न केल्याने न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष हजर राहून कामाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!