उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- विविध मागण्यांना घेऊन ग्रामरोजगार सेवक १५ ते २४ जानेवारी या कालावधीत नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत.या लाँग मार्चमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलही ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार असून त्याबाबतचे निवेदन ग्रामरोजगार सेवक संघटना गडचिरोलीच्या वतीने संबंधित तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
ग्रामरोजगार सेवकांच्या विविध न्याय मागण्या शासन स्तरावर प्रलंबित असून त्या सोडविण्यात याव्यात; यासाठी राज्यभरातील ग्रामरोजगार सेवक १५ ते २४ जानेवारी या कालावधीत नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार आहेत.या लाँग मार्चमध्ये गडचिरोली जिल्ह्यातीलही ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार आहेत.त्याबाबतचे निवेदन बाराही तालुक्यातील संघटनांनी संबंधित तहसीलदारांना सादर केले आहे.
सध्या खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगामातील पिकांची काढणी करण्यासाठी बराच विलंब आहे. या कालावधीत शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेक गावात सध्या रोहयोचे काम सुरू करण्यात आले आहे.यातून शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळाला आहे.मात्र १५ ते २४ जानेवारीपर्यंतच्या लॉग मार्चमध्ये जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक सहभागी होणार असल्याने मग्रारोहयोचे कामे ठप्प पडणार आहेत.

