उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- उमरेड तालुक्यातील सुरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भाजपाचे उमरेड तालुका महामंत्री राजू ढेंगरे वय ४८ वर्षे रा.दिघोरी,नागपूर यांची शुक्रवारी मध्यरात्री निर्दयीपणे हत्या करण्यात आली.ढेंगरे यांचा नागपूर-उमरेड महामार्गावरील कुही फाट्यालगत ढाबा आहे.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २:३० वाजण्याच्या सुमारास ते गाढ झोपेत असतानाच ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी त्यांचा गळा आवळून डोक्यावर काठीने हल्ला केला.
तीन वर्षांपासून ढेंगरे हे कुही फाट्यालगत ढाबा चालवतात.ढाबा सोबतच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात या परिसरात त्यांचे नाव आहे.नुकत्याच पार पडलेल्या सुरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ते सदस्य म्हणून विजयी झाले होते.महिनाभरापूर्वी त्यांनी ढाब्यावर मंडला आणि आदी नामक दोन नोकर ठेवले होते.दोन्ही नोकरांना दिवाळीसाठी गावाकडे परत जायचे होते.त्यांनी राजू ढेंगरे यांना मजुरी मागितली.यावरून भांडण झाले.थोडा वादही उद्भवला.ढंगरे यांचे नागपुरातील दिघोरी येथे निवासस्थान आहे.कधी ढाबा तर कधी घरी असा त्यांचा मुक्काम असायचा शुक्रवारी उशीर झाल्याने ते ढाब्यावर असलेल्या खाटेवरच झोपले.ते गाढ झोपेत असताना आरोपींनी कापडाने गळा आवळला व काठीने वार केले.यामध्ये ढेंगरे गंभीर जखमी होत जागीच ठार झाले.त्यांच्या चेहऱ्यावर,मानेवर,डोक्यावर गंभीर मार आहे.या घटनेनंतर आरोपी पसार झाले.या संपूर्ण घटनेवेळी अन्य एक पांडू नावाचा नोकर घटनास्थळी होता.कुही पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ढेंगरे यांनी दोन्ही नोकरांना कामावर ठेवतान आधारकार्डही घेतले नसावे, यामुळे त्यांचा पत्ता लागू शकला नाही.आता केवळ मोबाइलचा सीडीआर तपासल्यानंतरच मोबाइलचा एक धागाच या खुनाच्या तपासात तपास यंत्रणेला कामाचा ठरणार आहे.हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी ढेंगरे यांचे चारचाकी वाहन पळवले.ढाब्यावरच त्यांची एमएच ४०,एसी ७७०७ ही अल्टो गाडी उभी होती.आरोपींनी वाहनाची चावी घेत चारचाकी पोबारा केला.मृत राजू डेंगरे यांनी नोकरांना कामावर ठेवताना त्यांच्याकडून कोणतेही कागदपत्रे घेतली नाहीत. आरोपींचे नाव आणि गाव कुणालाही माहिती नाही. त्यांच्या बोलीभाषेवरून ते मध्य प्रदेशातील असावेत, असा कयास लावला जात आहे.घटनास्थळावरून आरोपींनी चारचाकी वाहन पळविल्यानंतर काही अंतरावर जात नाहीत तोच त्यांच्या वाहनाचा अपघात झाला.विहीरगाव पुलालगत असताना अल्टो कार पलटली.या अपघातानंतर काहींनी धाव घेत दोघांनाही सहीसलामत बाहेर काढले.अशातच काही अंतरावर पुन्हा एका वाहनाचा अपघात झाला.लोकांनी दुसऱ्या अपघात स्थळाकडे धाव घेतली तर इकडे या दोन्ही आरोपींनी अपघात स्थळावरूनही पळ काढला.

