Wednesday, June 10, 2026
Homeकोंढाळाकोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पडली पार.... -तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त...

कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पडली पार…. -तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांची निवड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज) :-ग्रामसभा म्हटले की,मुक्या माणसालाही वाचा फुटते; असा अनेक गावांतील ग्रामसभेतील प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.काही ठिकाणी सकाळी सुरू झालेली ग्रामसभा रात्री उशिरा पर्यंत सुरू असते.गावातील घरकुलाचा विषय असला तर ग्रामसभेत तुफान गर्दी आढळून येते.मात्र,इतर वेगळे विषय असले की,कोरम अभावी ग्रामसभा तहकूब केली जाते.अशातच आज,मंगळवार २० ऑगस्ट रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पार  पडली असल्याचे दिसून आले.
ग्रामपंचायत समाज मंदिराच्या सभागृहात दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या ग्रामसभेत सर्वप्रथम कृषी सहाय्यक तुळसकर यांनी कृषी योजना विषयी तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांविषयी गावातील नागरिकांना माहिती दिली.त्यानंतर मागील सभेच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात आले.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करून समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात आली.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२५-२६ करीता आराखडा तयार करणे, विविध शासकिय पत्राचे व जनतेच्या प्राप्त अर्जाचे वाचन करून निर्णय घेणे,विविध शासकिय योजनेअंतर्गत कामाची निवड करून अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय प्रामुख्याने घेण्यात आले.महत्वाचे म्हणजे,गावातील तंटामुक्त गाव समिती आजही सक्रिय असून गावातील विविध समस्यांचे आजही निराकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे.समितीच्या वतीने महिन्यातील एक तारीख ठरवली जाते व आलेल्या तक्रारी,तंटे व इतर अर्जांवर सभा आयोजित करून न्याय निर्वाळा केला जातो.अशातच एक ते दोन अध्यक्ष पद सोडले तर तब्बल १५ वर्षांपासून बिनविरोध तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांची निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या ग्रामसभेतही तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी हरिभाऊ पत्रे यांना नियुक्त करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.झालेल्या ग्रामसभेत कुठल्याही प्रकारचा गोंधळ वा इतर बाबी दिसून न आल्याने अगदी शांततेने कोंढाळा ग्रामपंचायतीची ग्रामसभा पहिल्यांदाच शांततेत पार पडल्याचे दिसून आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!