Thursday, April 30, 2026
Homeनागपूरकुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् नागपुरात दंगल घडली..

कुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् नागपुरात दंगल घडली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरला औरंगजेबाची कबर हटाव मोहिमे अंतर्गत पहिल्यांदाच गालबोट लागले आहे.बाबरी पाडण्याच्या वेळी शांत राहिलेल्या नागपूरमध्ये सोमवारी १७ मार्च २०२५ रोजी औरंगजेबाची कबर पाडण्याच्या मागणीसाठी दंगल उसळली.विश्व हिंदू परिषदेच्या आणि बजरंग दलाच्या निदर्शनांमध्ये कुराणातील आयती जाळल्याची अफवा पसरली अन् दंगल उसळली.
ज्या महाल भागात आरएसएसचे मुख्यालय आहे त्याच भागातून हिंसाचार सुरू झाला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाल परिसरातून  आमदार आहेत.दंगल उसळीत जमावाने उभ्या वाहनांना आग लावली,घरांची तोडफोड केली आणि पोलिसांवरही हल्ला केला.यामध्ये ३ डीसीपींसह ३३ पोलिस जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू(संचारबंदी) लागू करण्यात आला आहे. हिंसाचारग्रस्त भागात पोलिस ध्वज मार्च काढत आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल हे या हिंसाचाराला सुनियोजित कट म्हणत आहेत. फडणवीसांच्या मते,व्हॉट्सॲपवर व्हिडिओ व्हायरल करून लोकांना गोळा करण्यात आले.यातर हिंसाचार झाला.हिंसाचाराच्या वेळी हाणामारीसह रात्रीच्या सुमारास एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली.जिकडे-तिकडे सळो की पळो अशी परिस्थिती निर्माण झाली होती.पहिल्यांदा उपराजधानीला गालबोट लागल्याने सगळीकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!