- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होताच पक्षा अंतर्गत तिकीट मिळावी; याकरीता अनेकजण प्रयत्न करतांना दिसून येत आहेत.विविध पक्षांकडून काही जुन्याच उमेदवारांना तिकीट देण्यात आली आहे.तर काहींना ‘वेट अँड वाच’ च्या भूमिकेत ठेवण्यात आल्याने उमेदवारीसाठी अनेकांची धाकधूक वाढली आहे. अशातच गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात कहाण्यांमध्ये मध्ये ‘ट्विस्ट’ येऊ लागला आहे.त्यामुळे पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास बंड पुकरणार की काय?अशी चर्चा आता रंगू लागली आहे.काहीजण तिकीट मिळू नये; यासाठी नवनवीन हतकंडे वापरून उलट ‘त्यांना’ मोठी सहानुभूती मिळण्यास मदत करू लागले आहेत.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज,गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी गडचिरोली विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.डॉ.मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ.देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.आरमोरी व अहेरी या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर अहेरी या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे.त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.आज २४ ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून ६ व्यक्तींनी १६ नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून ७ व्यक्तींनी १९ अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून ६ व्यक्तींकडून ९ अर्जाची उचल करण्यात आली आहे.जिल्ह्यात तीन दिवसात एकूण १३७ नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत २९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत आहे.
- Advertisement -

