Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीऐन सणाच्या दिवशीच नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा आढळला मृतदेह..!

ऐन सणाच्या दिवशीच नाल्यात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा आढळला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पोळा सणानिमित्त शासकीय आश्रम शाळेतून घरी आलेल्या चिमुकल्याचा नाल्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,शुक्रवार २२ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.रिशान प्रकाश पुंगाटी वय ६ वर्षे रा.कोयर,ता.भामरागड, जि.गडचिरोली असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो इयत्ता पहिल्या वर्गात शासकीय आश्रम शाळा लाहेरी येथे शिकत होता.
पोळा सण असल्याने रिशान हा आश्रम शाळेतून घरी परतला होता.त्याचे वडील प्रकाश पुंगाटी यांनी त्याला सणासाठी गावाकडे घेऊन आले होते.अश्यातच गुरुवार २१ ऑगस्ट रोजी रिशान हा खेळता-खेळता गावानजीक असलेल्या नाल्याजवळ गेला.सायंकाळ होऊनही तो घरी परतला नसल्याने गावातील नागरिकांनी त्याचा शोध घेतला.मात्र,रिशानचा कुठेही थांगपत्ता लागलेला नसल्याने परत आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास महसूल प्रशासनासह ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवली असता,गावानजीक असलेल्या नाल्यात चिमुकल्या रिशानचा मृतदेह आढळून आला.त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.ऐन पोळा सणाच्या दिवशीच मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांच्या आनंदावर एकप्रकारे विरजण पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!