Wednesday, April 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी मिळणार केवळ ५००...

आता लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी मिळणार केवळ ५०० रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता बहिणींची झडती सुरू व्हायला लागल्याचे दिसून येत आहे.सुरुवातीला सरसकट महिलांना १५०० रुपये खात्यात जमा करण्यात आले व नंतर काही कालावधीतच लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरविण्यात आल्या.अशातच आता सरकारने पुन्हा एकदा योजनेत बदल केला आहे.आता लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपये मिळणार आहेत.तर १५०० रुपये केवळ अश्या महिलांना मिळणार आहेत,ज्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाहीत.
‘या’ महिलांना मिळणार केवळ ५०० रुपये👇
“नमो किसान सन्मान निधी” चा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त ५०० रुपये मिळतील.नमो किसान सन्मान योजनेअंतर्गत,राज्य सरकार ६ हजार रुपये आणि केंद्र सरकार ६ हजार रुपये देते.अशा प्रकारे एकूण १२ हजार वार्षिक,तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार दिले जातात.त्यामुळे,किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना उर्वरित फक्त वार्षिक ६ हजार रुपये आणि दरमहा ५०० रुपये फरक म्हणून मिळतील.त्यामुळे अश्या महिला शेतकऱ्यांना आता केवळ ५०० रुपयांवरच समाधान मानावे लागणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!