- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-मोठ-मोठी महाविद्यालये,वसतिगृहे तसेच इतर ठिकाणी रॅगिंगच्या घटना उघडकीस येऊन अनेकदा अनुचित प्रकारासह टोकाचे पाऊल उचलण्यात येत असल्याने वाढत्या रॅगिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी)कठोर पावले उचलली आहेत.येत्या शैक्षणिक वर्षांपासून एखाद्या महाविद्यालय अथवा संस्थेमध्ये रॅगिंगची घटना घडल्यास सबंधित संस्थेवर कठोर कारवाई करण्याचा इशारा यूजीसीने दिला आहे.
रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत अँटी-रॅगिंग समितीची स्थापना होणे अनिवार्य असल्याचे यूजीसीने सर्व संस्थांना पाठवलेल्या पत्रकात म्हटले आहे.तसेच प्रत्येक संस्थेत महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य असेल.या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सदर घटना कैद झाल्यास तातडीने त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशा घटना रोखल्या जाव्यात,अशी अपेक्षाही यूजीसीने व्यक्त केली आहे.
कॅमेऱ्यांशिवाय रॅगिंगविरोधात जनजागृती करण्यासाठी अँटी रॅगिंग कार्यशाळा,परिषद आयोजित करण्यात येणार आहेत.तसेच रॅगिंग रोखण्यासाठी धोक्याच्या घंटा बसवणे,विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, विद्यार्थ्यांमधील रॅगिंग करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या परिणामांची कल्पना देणे, असे उपक्रम शैक्षणिक संस्थांनी हाती घ्यायचे आहेत. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत ॲडमिशन केंद्र,फी भरणा केंद्र, वाचनालय,उपहारगृह,वसतीगृह आदी महत्त्वाच्या ठिकाणी अँटी-रॅगिंग पत्रके लावण्यात येणे अपेक्षित आहे.ही पत्रके सर्वांना व्यवस्थित वाचता येतील,अशा मापाची आणि आकाराची असावी,असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

