- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा,या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली.तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत.या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.ज्यावेळी ही योजना सुरू झाली,त्यावेळी एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते.त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. मात्र,आता ‘पीएम किसान’ योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करतांना पती,पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.त्याचबरोबर वारसान हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे; त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर,इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात,जे पेन्शनधारक आहेत,त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता.हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत.१९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करू शकते.मात्र,सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
- Advertisement -

