- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज,शनिवार २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा
२० वा हप्ता जारी करण्यात येणार आहे.त्यानुसार आज तब्बल ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान)
योजनेअंतर्गत,दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये हस्तांतरित केले जातात.पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान,दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर-मार्च दरम्यान दिला जातो.म्हणजेच वर्षाला ६ हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो.
- Advertisement -

