गडचिरोली :- तालुक्यात विट्टाभट्टीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत असतो. खेड्यापाळ्यात आपल्या शेतामधे व्यवसायीक विटाचा व्यवसाय करतात व शहराच्या ठिकाणी घर बांधकाम वा इतर बांधकामांसाठी विक्री करीत असतात.परंतु जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे विटाभट्टी ठेकेदाराच्या ताळपत्री झाकुन सुद्धा विटा नासधुस झाल्यात.कारागीर बनवित असलेल्या कच्या विटा गळून गेल्यात; त्यामुळे विटाभट्टी व्यवसायाचे लाखोचे नुकसान झाले आहे. परिसरातील शुभम दशमुखे रा.पोर्ला,रवि चुधरी रा.गोगांव,नेताजी झोडगे रा.पोर्ला, रमेश भांडेकर रा.माहेतुकुम,रोहीत बारसागडे रा. पोर्ला तसेच साखरा,काटली,जेप्रा,दिभना, आदि विटा व्यवसायकीचे लाखोंचे नुकसान झाले.मिळणारा घास अवकाळी पावसाने पळविला असल्याने आता पुन्हा विटा कश्या बनवाव्या म्हणुन विटाभट्टी व्यवसायीक चिंतेत पडले आहेत.अवकाळी पावसाने व वादळ वाऱ्याने झालेली विटाभट्टीची नुकसान भरपाई शासन व प्रशासनाने द्यावी; तलाट्यांनी पंचनामे करावे व शासनाकडे अहवाल पाठवून झालेल्या नुकसानाची भरपाई प्रशासनाने द्यावी; अश्या प्रकारचे निवेदन तहसिलदार गडचिरोली यांच्याकडे शुभंम दहामुखे,रवि चुधरी,नेताजी झोडगे,रोहीत बारसागडे,रमेश भांडेकर तसेच इतर विटा भट्टी व्यावसायिकांनी दिले आहे.
अवकाळी पावसाने विट्टाभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान….-नुकसानभरपाई देण्याची मागणी….
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

