Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीअखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. - महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

अखेर मुख्याध्यापक यांना चौकशीसाठी बुलावा.. – महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरीचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी शहरातील महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक प्रकरण मागील काही कालावधीपासून गाजू लागले आहे.प्रकरणी भाजपाचे गडचिरोली जिल्हा सहसंयोजक पंचायत राज व ग्राम विकास विभाग पदाधिकारी कैलास जे.बगमारे यांनी विविध स्तरावर तक्रारी दाखल केल्याने चौकशीचे धाड सत्र सुरू झाले आहे.बगमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतेच जिल्हा स्तरावर चौकशी सुरू असून परत आज,शनिवार ३१ मे रोजी महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी येथील मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार यांना तक्रार अर्जाचे चौकशीच्या अनुषंगाने म्हणणे मांडण्याकरीता आरमोरी पोलीस ठाण्यात बुलावा करण्यात आला आहे.
  •                     प्रकरण काय?👇
साईनाथ अद्दलवार(मुख्याध्यापक महात्मा गांधी उच्च विद्यालय आरमोरी )यांनी सेवा ज्येष्ठता यादी वगळून मुख्याध्यापक पदी नियुक्ती व त्यांनी २ मे २०१२ नंतर केलेली अवैध शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती तसेच शिक्षक भरती घोटाळा मधून बेकायदेशीर मार्गाने जमा केलेली संपत्ती याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कैलास बगमारे यांनी केली आहे.त्यानुसार आता चौकशीचे धाड सत्र सुरू झाल्याने पुढील कारवाईकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!