Thursday, May 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या..

अखेर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका निवडणुकानंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार,या आशेवर असणाऱ्या व राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती.त्यानुसार,आज,सोमवार १२ जानेवारी रोजी
राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने
दिलासा देत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ मंजूर केली आहे.यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते.विशेष म्हणजे,सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.या निकालामुळे ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकीचा धुराळा उडणार हे आता स्पष्ट झाले आहे.आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यांची अतिरिक्त सवलत देत १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडण्यास सांगितले आहे.यामुळे पुढील ४८ तासांत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.यात दोन टप्पे पडू शकतात.पहिल्या टप्प्यात ज्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पेक्षा जास्त जात नाही,तिथे निवडणुका तात्काळ पार पडतील.तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हा परिषदांचे भवितव्य येत्या २१ जानेवारीच्या सुनावणीवर अवलंबून असेल.२१ जानेवारी २०२६ रोजी ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.या सुनावणीत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आणि सभापती पदांचे आरक्षण यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका आणि नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील. अश्यातच राज्य निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार आज सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.हे विशेष
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!