Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरहिंसाचारातील आरोपीचा राजकीय सूडबुद्धीतून अटक केल्याचा दावा; जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव..

हिंसाचारातील आरोपीचा राजकीय सूडबुद्धीतून अटक केल्याचा दावा; जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवारी १७ मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.अशातच हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानने नागपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.फहीमने असा दावा केला आहे की,विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे त्याला राजकीय सूडबुद्धीतून अटक करण्यात आली.अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचा  शहराध्यक्ष फहीम खान याची काल शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.यानंतर फहीमने नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला.जामीन अर्जात म्हटले आहे की,त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे आणि त्याने जमावाला भडकावल्याचा कोणताही पुरावा नाही.हे आरोप खोटे आणि निराधार आहेत आणि पोलिसांनी हिंसाचारात त्याची थेट भूमिका असल्याचे सांगितलेले नाही.त्याच्याविरुद्ध दाखल केलेला खटला राजकीय सूड बुद्धीने चालवला जात आहे.कारण १८ मार्च रोजी त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.त्याचे वकील अश्विन इंगोले म्हणाले की,या प्रकरणाची सुनावणी २४ मार्च रोजी होऊ शकते.काल शुक्रवारी संध्याकाळपर्यंत,पोलिसांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी १४ जणांना अटक केली. त्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या १०५ झाली आहे,ज्यात १० किशोर वयीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक न्यायालयाने १७ जणांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल शुक्रवारी संध्याकाळी नागपूरला पोहचले असून आपण रात्री नागपूरलाच राहू.नागपूरमधील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही,असे त्यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत म्हटले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!