Monday, January 19, 2026
Homeनागपूरहिंसाचारातील आरोपीचा राजकीय सूडबुद्धीतून अटक केल्याचा दावा; जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव..

हिंसाचारातील आरोपीचा राजकीय सूडबुद्धीतून अटक केल्याचा दावा; जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
नागपूर :-औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सोमवारी १७ मार्च रोजी नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी मास्टरमाइंड फहीमसह ६ आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीमवर ५०० हून अधिक दंगलखोरांना गोळा करण्याचा आणि हिंसाचार भडकवण्याचा आरोप आहे.अशातच हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानने नागपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.फहीमने असा दावा केला आहे की,विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केल्यामुळे त्याला राजकीय सूडबुद्धीतून अटक करण्यात आली.अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पक्षाचा  शहराध्यक्ष फहीम खान याची काल शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.यानंतर फहीमने नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला.जामीन अर्जात म्हटले आहे की,त्याला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे आणि त्याने जमावाला भडकावल्याचा कोणताही पुरावा नाही.हे आरोप खोटे आणि निराधार आहेत आणि पोलिसांनी हिंसाचारात त्याची थेट भूमिका असल्याचे सांगितलेले नाही.त्याच्याविरुद्ध दाखल केलेला खटला राजकीय सूड बुद्धीने चालवला जात आहे.कारण १८ मार्च रोजी त्यांनी विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.त्याचे वकील अश्विन इंगोले म्हणाले की,या प्रकरणाची सुनावणी २४ मार्च रोजी होऊ शकते.काल शुक्रवारी संध्याकाळपर्यंत,पोलिसांनी नागपूर हिंसाचार प्रकरणात आणखी १४ जणांना अटक केली. त्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या १०५ झाली आहे,ज्यात १० किशोर वयीन मुलांचा समावेश आहे. याशिवाय स्थानिक न्यायालयाने १७ जणांना २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल शुक्रवारी संध्याकाळी नागपूरला पोहचले असून आपण रात्री नागपूरलाच राहू.नागपूरमधील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांना सोडले जाणार नाही,असे त्यांनी मंगळवारी राज्य विधानसभेत म्हटले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!