- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा-भंडारा-नागपूर या प्राधान्य क्रमाने खनिकर्म (मायनिंग) प्रकल्प हाती घेतले आहेत.यामध्ये गडचिरोलीत ५० हजार कोटींची औद्योगिक गुंतवणूक झाली असून खनिजावर आधारित प्रकल्पामुळे गडचिरोली स्टिल प्रकल्प म्हणून उदयाला येत आहे.चंद्रपूर येथे कोल गॅसिफिकेशन प्लँट करण्याचा निर्णय झाला आहे. या प्रकल्पाचा सामंजस्य करार होऊन केंद्राची मान्यता देखील मिळाली आहे.
गडचिरोली,चंद्रपूर व नागपूर येथे स्टिलवर गुंतवणूक करण्यासाठी अनेक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. गडचिरोली समृद्धी महामार्गाशी गडचिरोली जोडत आहोत.येथील नक्षलवादाच्या समस्येशी जोरदार लढाई सुरू आहे.येत्या तीन वर्षांत गडचिरोली नक्षल्यांपासून मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.वर्षभरात १५०० युवक पोलिस दलात भरती झाले. यातील ३३ नक्षलपीडित आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलतांना दिली आहे.भविष्यातील स्टिल सिटी म्हणून ख्यात होत असलेल्या गडचिरोली येथे नवीन वर्षात विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.या विमानतळासाठीचा शासन निर्णय निघाला असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.
गडचिरोलीतील नियोजित विमानतळासाठी मौ.
मुरखळा,पुलखल,कनेरी,मुडझा (बु.), मुडझा (तु.) येथील जमीन प्रस्तावित केली आहे.या भूसंपादनासाठी गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून भूसंपादनाचा प्रस्ताव येताच कार्यवाही सुरू करण्यात येईल,असेही बिदरी यांनी म्हटले आहे.जानेवारी २०२५ मध्ये महिना अखेरीस भूसंपादन सुरू होणे अपेक्षित असल्याचे त्या म्हणाल्या.मुरखळा,पुलखल व कनेरी गावातील अंदाजे २२९.४३ हे.आर खासगी व शासकीय जमीन संपादीत करण्यात येणार आहे.
- Advertisement -

