Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीसामूहिक वनहक्क प्राप्त गावांना मिळणार नवसंजीवनी- आता गावातच उपलब्ध होणार रोजगार
spot_img

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांना मिळणार नवसंजीवनी- आता गावातच उपलब्ध होणार रोजगार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातील सामूहिक वनहक्कांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे व त्याची अंमलबजावणी करण्याकरिता शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी संजय मीना यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामपंचायतीतील गावांना समित्या गठीत करण्याचे आदेश दिल्यानंतर; जिल्हा स्तरावरील महिला आर्थिक विकास महामंडळामधे गावातील समित्यातील अध्यक्ष,सचिव व सदस्य यांच्या ७ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत असल्याने सामूहिक वनहक्क प्राप्त गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

मागील कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील गावांना सामूहिक वनहक्क मिळाले आहेत.परंतु,त्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने मिळालेल्या अधिकारापासून वंचित राहावे लागत होते.गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,आदिवासीबहुल,नक्षलग्रस्त आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी लोक मुख्यत्वे वनावर अवलंबून असल्याने; त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता कायदा मंजूर करण्यात आला आहे.सामूहिक वनहक्क प्राप्त क्षेत्राचे संवर्धन संरक्षण करून त्यातून मिळणाऱ्या शाश्वत वन उत्पादनातून,त्याचप्रमाणे मिळालेल्या मालकी स्वामीत्व हक्कातून जीवनमान उंचवावे, हाच मुख्य हेतू आहे.

सामूहिक वनहक्क प्राप्त गावांतील प्रमुख कामे

सामूहिक वनहक्कप्राप्त गावांचे संरक्षण व व्यवस्थापन आराखडे तयार करणे,संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करणे, अंमलबजावणी करणे,समितीचे सनियंत्रण करणे,समितीचा आढावा घेणे,ग्रामसभा व सामूहिक व्यवस्थापन समिती सदस्यांना क्षमता वृद्धी प्रशिक्षण देणे,आराखडे तयार करण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती व शासकीय सेवा ग्रामस्तरीय समितीला उपलब्ध करून देणे व इतर सार्वजनिक रोजगार निर्मितीवर भर देणे; अशी प्रमुख कामे यामार्फत केली जाणार आहेत.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!