Wednesday, March 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय.. - सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त...

सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय.. – सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-न्यायालयांमध्ये विविध खटले प्रलंबित असून न्यायालये स्थापन केली पाहिजेत. देशात गुन्हेगारी वाढत चालण्याचे मुख्य कारण म्हणजे विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत आहेत. दिवसाढवळ्या खून व इतर घटना होऊनही यातील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतो.त्यामुळे सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय,असे महत्वपूर्ण निरिक्षण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने आज,शुक्रवारी नोंदवले.तब्बल ५५ गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आरोपीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असता त्याच्या अर्जावर सुनावणी करतांना खंडपीठाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.गुंडांबद्दल कोणतीही सहानुभूती बाळगता कामा नये.त्यांच्याविरोधातील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी अधिक जलदगती न्यायालये स्थापन केली पाहिजेत.साक्षीदारांचे मन वळवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कुख्यात गुन्हेगारांशी संबंधित खटल्यांना जाणूनबुजून विलंब केला जातो,अशी गंभीर निरिक्षणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यावेळी नोंदवली.गुंडांबद्दल कोणतीही चुकीची सहानुभूती दाखवता कामा नये, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे,विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत असल्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर झाल्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यावश्यक असून,निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी...

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!