उद्रेक न्युज वृत्त :-न्यायालयांमध्ये विविध खटले प्रलंबित असून न्यायालये स्थापन केली पाहिजेत. देशात गुन्हेगारी वाढत चालण्याचे मुख्य कारण म्हणजे विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत आहेत. दिवसाढवळ्या खून व इतर घटना होऊनही यातील आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटतो.त्यामुळे सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय,असे महत्वपूर्ण निरिक्षण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने आज,शुक्रवारी नोंदवले.तब्बल ५५ गुन्हेगारी खटल्यांचा सामना करणाऱ्या आरोपीने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले असता त्याच्या अर्जावर सुनावणी करतांना खंडपीठाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.गुंडांबद्दल कोणतीही सहानुभूती बाळगता कामा नये.त्यांच्याविरोधातील खटले जलदगतीने निकाली काढण्यासाठी अधिक जलदगती न्यायालये स्थापन केली पाहिजेत.साक्षीदारांचे मन वळवण्यासाठी वेळ मिळावा म्हणून कुख्यात गुन्हेगारांशी संबंधित खटल्यांना जाणूनबुजून विलंब केला जातो,अशी गंभीर निरिक्षणे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने यावेळी नोंदवली.गुंडांबद्दल कोणतीही चुकीची सहानुभूती दाखवता कामा नये, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे,विविध गुन्ह्यांत सबळ पुराव्याअभावी आरोपी निर्दोष सुटत असल्याच्या वस्तुस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
सामान्य माणसाच्या नजरेत कायद्याचे राज्य पूर्णपणे कमकुवत झालेय.. – सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

