Monday, August 10, 2026
Homeमुंबईसर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी...

सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य….-शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :-राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा हा अनिवार्य विषय आहे.मागील वर्षात काही मंडळाच्या शाळांना थोडीशी सवलत देण्यात आली होती; परंतु आता सर्वच शाळांना पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य असल्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी आज रविवारी नवी मुंबईत सांगितले.नवी मुंबईतील वाशी येथे सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी केसरकर यांनी हे प्रतिपादन केले.केसरकर पुढे म्हणाले,मराठी भाषेची सर्व मंडळे एकत्र आणण्यासाठी आपल्या राज्यातही लवकरच ‘मराठी भाषा भवना’ची निर्मिती होणार आहे.यासाठी शासनाने २६० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.

मराठी भाषा भवनाच्या निर्मितीनंतर मराठी भाषा संवर्धनाशी संबंधित असलेली सर्व कार्यालये,मंडळे ही एकाच इमारतीत येणार आहेत. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व गती येईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा आवर्जून उल्लेख करीत केसरकर म्हणाले, मातृभाषेतून शिक्षण ही बाब काळाची गरज आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे की, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षणही मातृभाषा मराठीतून शिकविण्याचे धोरण स्वीकारले. प्रत्येक जिल्ह्याला मराठी भाषेचे काम करण्यासाठी निधीची तरतूद करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध उपक्रम, कार्यक्रमांमधून मराठी भाषा संवर्धनाचे काम जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न मराठी भाषा विभागाकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुढील वर्षी विश्व मराठी संमेलन घेण्यासाठी आम्हाला लवकर निधी मिळाला, तर त्याचे नियोजन यापेक्षाही अधिक चांगले करू आणि हे संमेलन वैश्विक स्तरावर आपला एक वेगळा ठसा उमटवेल, असा आमचा प्रयत्न राहील, असेही केसरकर म्हणाले. या वेळी आम्हाला खूप कमी वेळ मिळाला; तरीही आम्ही हे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!