Wednesday, August 5, 2026
Homeमुंबईसरळसेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली लवकरच होणार निश्चित.. - चंद्रपूर,गडचिरोलीसह...

सरळसेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली लवकरच होणार निश्चित.. – चंद्रपूर,गडचिरोलीसह आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांचा समावेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासाठी सुधारित आरक्षण व बिंदुनामावली लवकरच निश्चित होणार असून नुकत्याच मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.यात चंद्रपूर,गडचिरोलीसह रायगड,पालघर, नाशिक,धुळे,नंदुरबार व यवतमाळ या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळास अहवाल सादर करण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली २३ मे २०२५ रोजी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे.या समितीच्या बैठका जवळपास पार पडल्या असून लवकरच ‘एसईबीसी’ प्रवर्गाला यवतमाळ,चंद्रपूर, गडचिरोली,रायगड,नाशिक,धुळे,पालघर,नंदुरबार या आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांत गट क आणि गट ड भरतीत १० टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता बळावली असल्याने एसईबीसी(socially and educationally Backword class)म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी भरतीचा लाभ नोकरीस इच्छुक असणाऱ्या हजारो नागरिकांना होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

वाघाचा हल्ला; एकाचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबेना.मानव वाघांच्या दडित जातो की,वाघ मानवांच्या दडित येतो,हेच कळेनासे झाले आहे.हल्ली मानवाची केवळ किंमत ठरवली जात...

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!