Saturday, April 18, 2026
Homeधाराशिवसरपंचाची कमाल; स्वतःच्याच हल्ल्याचा केला बनाव..

सरपंचाची कमाल; स्वतःच्याच हल्ल्याचा केला बनाव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
धाराशिव :-राज्यात सध्याच्या घडीला बीड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंचाने स्वतःच्याच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील ३८ वर्षीय सरपंच नामदेव बालिश निकम यांच्यावर २६ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास होनाळा ते जवळगा (ता.तुळजापूर)रस्त्यावर चार अज्ञात व्यक्तींनी दगड, अंडी,पाईपने मारुन सरपंचांच्या चारचाकीचे काच फोडून पेट्रोलने भरलेले फुगे सरपंचांच्या व त्यांचे साथीदार प्रवीण इंगळे यांच्या अंगावर फेकले.याबाबतची फिर्याद निकम यांनी २७ डिसेंबरला दिल्यानंतर राज्यात सर्वत्र खळबळ उडाली होती.त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी तातडीने यात लक्ष घालून अतिरिक्त पोलिस अधीक्षकांकडे तपास दिला.अवघ्या पाच दिवसांत तपास करून फिर्यादीने दिलेला जबाब व घटनास्थळाचा पंचनामा केला असता दोन्ही बाबी वेगवेगळ्या आढळून आल्याने पोलिसांनी विश्वासात घेऊन दोघांचीही चौकशी केली.त्यानुसार बंदुकीचा परवाना मिळविण्याकरीता स्वतःच हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.त्यानुसार आता बनाव प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!