- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मंगळवारी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सरकारला खडेबोल सुनावले आहे.त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,घोषणा आणि वस्तूस्थिती यात फरक असतो,हे सरकारने आधी लक्षात घ्यावं.! आधी कर्जमाफीची घोषणा केली,पण अटीशर्ती टाकून स्वतःच्याच घोषणेला कोलदांडा घातला.आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन केल्यानंतर आणि अधिवेशनात मुद्दा लावून धरल्यानंतर त्याला उत्तर देतांना अटीशर्ती काढल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.पण अंमलबजावणी मात्र अजूनही शून्य..आधीच खऱ्या दुष्काळाच्या सावटामुळं शेतकरी कमालीचा अडचणीत आहे आणि दुसरीकडं सरकार देखील त्यांच्याशी राजकीय डाव खेळत दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसं वागतंय.माझी सरकारला विनंती आहे की, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा..पण शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळलात तर पेचात पडाल.कर्जमाफीसाठी आता तारीख-पे-तारीखचा खेळ बंद करा आणि तातडीने अंमलबजावणी करा.दिल्लीत सरकारची कशी फजिती सुरुय बघताय ना…? असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.त्यामुळे सरकारने हवेत गोळीबार न करता तात्काळ शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.

- Advertisement -

