Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीशेतकऱ्यांना मिळणार बोनसची रक्कम….-नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो….खात्यावर...

शेतकऱ्यांना मिळणार बोनसची रक्कम….-नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो….खात्यावर जमा होणार रक्कम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-खरीप पणन हंगाम २०२३-२४ मधील धान खरेदीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशीची रक्कम अदा करण्याबाबत शासनाने २६ मार्चला परिपत्रक काढले आहे.त्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी महामंडळाला धान विक्री केली असो वा नसो धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार प्रतिहेक्टरी रुपये २० हजार प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत राहून प्रोत्साहन राशी बोनस अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

३१ मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना ८५ कोटी ३५ लाख ४७ हजार ७८० रुपये एवढी बोनसची रक्कम खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.राज्यातील धान उत्पादक दहा जिल्ह्यांना हा लाभ मिळणार आहे.त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे.सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांनी ई-पीक वर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.तसेच आदिवासी खरेदी संस्था किंवा महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या खरेदी संस्थांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!