- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी धान विक्री करून दोन महिने झालीत.मात्र,अद्यापही शासन स्तरावरून धानाचे चुकारे अदा करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भेडसावत आहे.त्यामुळे शासकीय धान्य खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करण्यात यावे; अन्यथा हजारो शेतकऱ्यांसह आंदोलन छेडण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासन आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते.बरेच शेतकरी धान विक्रीपासून वंचित असल्याने शासनाने धान खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.त्यातच दोन महिन्यांपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान्य विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे जमा झाले नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अगोदरच उसनवारी करून तसेच बँकांकडून कर्ज उचलून शेतकऱ्यांनी शेती पिकवली.धान्य विक्री चुकाऱ्यांच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना कर्जफेड,हात उसनवारी घेतलेली रक्कम तसेच शेतीची पुढील तयारी आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.चुकारे लवकर मिळणे अपेक्षित असतांनाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात धान चुकाऱ्यांची रक्कम अद्यापही आलेली नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे तात्काळ जमा करण्यात यावे; अन्यथा यासाठी आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी म्हटले आहे.
- Advertisement -

