Sunday, July 26, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था कार्यालय,सहाय्यक निबंधक कार्यालय,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकरी पात्र ठरले असून त्यांना एकूण ११ कोटी ७४ लाख ६६ हजार रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
राज्य शासनाने राबविलेली ही योजना संपूर्णपणे ऑनलाईन व आधार क्रमांकावर आधारित असून पात्र कर्ज खात्यांची माहिती बँकांकडून थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यासाठी २ हजार ९२६ पात्र कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली होती.त्यानुसार,शासनाकडून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्राप्त झाल्यानंतर त्या तातडीने शाखा,संस्था आणि गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या.
मात्र,या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने पात्र लाभार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी.
यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था गडचिरोली मुकुंद मेश्राम, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अधीक्षक लोमेश रंधये, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार,कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक राजू सोरते,उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर तोटावर,संबंधित संस्थांचे व्यवस्थापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की,यादीतील आपला क्रमांक किंवा आधार क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तातडीने जाऊन बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे,जेणेकरून कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत प्राप्त होऊ शकेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!